Saturday, December 20, 2014

स्व. श्री राजीव दिक्षित ह्यांचे विचार - Rajeev Rajiv dixit dikshit

नमस्कार ,
मागे मी दोन पानी ''चिमणीची कथा , चिमणीची व्यथा'' हि आपल्या संस्थेशी संबंधित कविता 
पाठविली होती , मला माहित आहे (मागे माझे इमेल संभाषण झाले होते ) कि आपल्या संस्थेचे मराठी / हिंदी अंक 
फार कमी संख्येत प्रकाशित होतात , पण हि विषयाला अनुकूल असलेली कविता असून सुद्धा 
प्रकाशित झाली नाही हेच आपल्या समाजाचे दुर्दैव आहे , इंग्रजीत अंक जास्त प्रकाशित होतात त्याचा 
उपयोग काय ? कारण काही ठिकाणी स्थानिक पातळीवर जेव्हा काम करणे जरुरीचे आहे 
तेव्हा तुम्हाला स्थानिक भाषेतच ते मांडावे लागते , पण बऱ्याच सामाजिक संस्थांची आज हीच अवस्था आहे 
कि त्यांना एक तर परदेशातून देणग्या येतात , त्यामुळे त्यांचे साहित्त्य हे जास्त करून इंग्रजीत प्रकाशित होते 
आणि त्या संस्था मात्र स्थानिक पातळीवर काम करतात असे दाखवतात , ह्या बाबतीत स्व. श्री राजीव दिक्षित ह्यांचे 
विचार ज्यांना पटतात त्यांना कळेल मला काय म्हणायचे आहे ते ! वर्ल्ड बँकेच्या (अमेरिकेच्या ) दबावाखाली सर्व देशच  
दबलेला आहे तिथे अशा संस्था आणि माझ्यासारखे सामान्य माणसे काय करणार ? 
सत्ता बदल होतात आणि सामान्य माणसाच्या जीवनात त्याचा काहीच फरक पडत नाही हेच खरे.  

नशीब कि आता शेतकऱ्यांना सावध करून नैसर्गिक शेणखत वापरूनच नैसर्गिक शेती करावी ह्याचा प्रसार होत आहे 
रासायनिक खतानी थैमान घातले ज्यामुळे पक्षांसकट सर्व जैव साखळी धोक्यात आली होती / आहे 
पण वेळीच सावध झाल्यमुळे तो धोका टळेल / कमी झाला आहे, पण हे काम ज्या सामाजिक संस्थांनी 
करायला हवे त्याऐवजी काही नि:स्वार्थी समाज सेवक हे काम करत आहेत. आणि पक्षी प्राणी माणूस ह्या  
जीव साखळीला विषारी पर्यावरणापासून वाचवत आहेत , सोबत जोडलेल्या लिंकवर ध्वनी चित्रफिती पहाव्यात 

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१

No comments:

Post a Comment