Friday, December 19, 2014

II प्रदूषण आणि दुष्काळ II - pollution and harvest - suresh pitre

II प्रदूषण आणि दुष्काळ II

जेव्हा झाली प्रगती मानवाची 
तेव्हा वाढली रेलचेल यंत्रांची 
वाढ झाली इथे कारखान्यांची 
निर्मिती झाली जगांत शहरांची II१II

शहरांत झाली गर्दी खेडुतांची  
बजबजपुरी झाली सर्व शहरांची 
कारखान्यांना गरज भासली इंधनाची 
गरज पूर्तीसाठी केली झाडतोडी II२II

नष्ट झाली शोभा जगांत निसर्गाची 
झाली मरुभूमी या नंदनवनाची 
डोंगर उजाड, नांदी हि वाळवंटाची 
झाली वाढ भयंकर तापमानाची II३II

झाली घट अतिशय पर्जन्यमानाची  
पातळी वाढली धूर, धूळ, प्रदूषणाची 
खेडेगावात शेतीला टंचाई पाण्याची 
शेतकऱ्याला लागली झळ दुष्काळाची II४II

कृषिप्रधान देशाला कमतरता धान्याची 
दारिद्र्य रेषेखाली उपासमार जनतेची 
तरुणांवर वेळ आली बेरोजगारीची 
झाली उन्हाने लाही लाही शहरवासियांची II५II

विजेची टंचाई, सक्ती भार नियमनाची 
तज्ञांची ओरड, झाली हानी निसर्गाची 
वेळ आली आता रोपे लावण्याची 
झाडे वाढविण्याची,पर्यावरण जपण्याची II६II

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

No comments:

Post a Comment