Saturday, August 2, 2014

कविता - नैसर्गिक आपदा

नमस्कार ,
माळीण गावात दरड कोसळून पूर्ण गावच गाडले गेले 
हि अत्त्यंत वाईट घटना घडली ती शब्दबद्ध करून 
लिहिलेली कविता ,

  II नैसर्गिक आपदा II

पाऊस धो धो पडला 
डोंगर तो धसला 
भसा भस कोसळला 
चिखल खाली वाहला II१II

गाढ होते सगळे  
गाव ते हो झोपले 
घास करुनी गावाचा 
भूमीने तो गिळला II२II

माळीण गांव भूमीत 
गेले कसे ते गाडले ?
फक्त नाव शिल्लक  
सारे भूमीत संपले II३II

निसर्गाचा कोप हा 
गावावर जाहला 
शेकड्यावरी मृतांचा 
आकडा तो पोचला II४II

किती रे तोडशील 
वृक्ष झाडे संपदा ?
किती रे सोसशील   
निसर्गाची आपदा II५II

संसार होता थाटला  
दैवाने हा उधळला 
जीवनाचा डाव हा 
क्षणात काही संपला II६II

महाभूताने क्षणात  
कार्यभाग साधला 
पाहुनी ते दृश्य सारे 
जमाव सुन्न जाहला II७II

दुःखाचा रंग हा    
आसमंती दाटला 
जन सागर इथे हा
मदतीस धावला  II८II

प्रगतीच्या ह्या भरात 
माणूस का विसरतो ? 
निसर्गास नित्य आपण 
किती किती शोषतो II९II

माणसाचा जीव आज 
किती क्षुद्र जाहला 
मदतीचा आकडा तो 
काही लाखात मोजला II१०II

लेखक / कवी - सुरेश पित्रे.

पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

No comments:

Post a Comment